Tuesday, March 26, 2013

होळीच्या ओळी...

होळीच्या ओळी...

अंतर्मन शहाणं असतं,
गप म्हटलं, की गप्प बसतं...

मला सारखं बजावत होतं,
दुष्काळ आहे, पाणी जपून वापर.
म्हटलं, नासाडीचं नको
डोक्यावर खापर...

... सकाळी मनसुबे रचले खूप
होळीची शाम रंगीन बनवू ...
रंगासोबत नशा जमवू

पण अंतर्मन आडवंच आलं,
बाहेरच्या मनाला पुरतं घेरलं...
 'होली है, अल्कोहोली नही' म्हणत,
मनसुब्यावर पाणीच फेरलं!

मी त्यालाच दरडावलं...
जपून वापर, दुष्काळ आहे...
मनसुब्यांवर पाणी फेरणे
दुष्काळात गैर आहे...

अंतर्मन शहाणं असतं..
आता ते गप्पच बसतं
........

No comments: