Saturday, October 24, 2009

समृद्धीची रास, घरोघरी.... ५६ टन सोने खरेदी !


धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे ऐन दिवाळीतले १२ ते १९ ऑक्टोबर दरम्यानचे आठ दिवस देशात ‘सोनियाचे दिन’ होते... दिवाळीच्या दिवसांना सोन्याची झळाळी आली आणि मंदीचे सावट त्यात पुरते झाकोळून गेले. गेल्या वर्षीपर्यंत,दिवाळीच्या दिवसांची चाहूल लागताच, कामगारांच्या बोनसच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरून जायचे. यंदा त्या बातम्या दिसल्याच नाहीत... त्या बातम्यांची जागा नव्या बातम्यांनी घेतली.
दिवस खरंच बदललेत काय?
दिवाळीचे दिवस यंदा सोन्याच्या विक्रीच्या दृष्टीने खासच लक्षणीय राहिले. यंदा या दिवसात लोकांनी तब्बल ५६ टन सोने खरेदी केले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षांच्या तुलनेत ३९.२ टक्के अधिक रु. ८,९०४ कोटींची मौल्यवान धातूची खरेदी केली गेली.
दिवाळीनिमित्त अनेक शहरांत जवाहि-यांनी एकत्र येऊन किंवा स्थानिक स्तरावर स्वतंत्रपणे सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीसाठी ग्राहकांना प्रोत्साहनपर विशेष योजना यंदा आखल्या आणि ग्राहकांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला.
सोने आता केवळ दागिन्यांच्या हौशीपुरते मर्यादित राहिलेले नसावे. भविष्यातील खडतर आर्थिक संकटांतून मार्ग काढण्याचा सुलभ मार्ग म्हणूनही त्याकडे पाहिले जात असावे. म्हणूनच, दिवसेंदिवस सोन्याचे भाव कडाडत असतानाही, सोन्याची खरेदी वाढते आहे... माणसातला ‘गुंतवणूकदार’ जागा झाल्याचेही हे लक्षण असावे..
देशाची आर्थिक राजधानी मुंबईचा समावेश असलेल्या पश्चिम विभागात सर्वाधिक १९.६ टन अर्थात रु. ३,११६.४० कोटींच्या सोन्याची विक्री झाली. त्या खालोखाल...
ही बातमीच वाचा ...
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=17869:2009-10-23-17-52-24&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104

No comments: